Wednesday, August 27, 2014



दुस्तर्कात सुविराम्यतां    ………। 
सत्तर्क करावा पण कुतर्क करणे काही  उपयोगी नाही …. एकदा एका तर्कट माणूस व त्याचा मुलगा रात्री झोपलेले असतात . रात्री थंडी पडते ..... मुलाला जाग येते … तो उठून वडिलांना म्हणतो बाबा बाहेर  थंडी पडली आहे . खिडकी बंद करा ........... वाडील आळशी व तर्कट असतात ते उत्तर देतात अरे बाळा माझ्या खिडकी बंद करण्याने बाहेरची थंडी  थोडीच कमी होणार आहे ?  या तर्का पुढे मुलगा निरुत्तर होतो … तसे  तर हा कुतर्क तांत्रिक रीतीने योग्य आहे . पण काही कामाचा  म्हणून श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात   दुस्तर्कात सुविराम्यतां श्रुतिमत्स्तर्कोनुसंधीयतां    ………।   

Monday, August 25, 2014

साई बाबा

साई बाबा देव आहेत  का नाहीत  वादाचा विषय आहे . अवतारत्व कोणास द्यावे त्याचे धर्मशास्त्रात खूप विवरण आहे  ,पूर्ण अवतार कोण ,अंश अवतार कोण ,अंशांशावतार  कोण ? इत्यादी बाबत सूक्ष्म विचार धर्मशास्त्रात आहे त्याविषयी कामाचे व बिनकामचे वाद सुरूचं आहेत ………… पण साई बाबांची मंदिर रूपी दुकाने थाटणे हे मला व्यक्तीश: योग्य वाटत नाही . एक परदेशी कंपनी अशी  दुकाने थाटू इच्छिते आहे असे ऐकिवात आहे ……  हे जर सत्य असेल तर याचा नक्कीच  विरोध करावा …………. तसेच शिर्डीस जे बाजारू रूप आले आहे ते सर्व श्रद्धेचा ओंगळवाणा बाजार मांडला आहे असे मला वाटते .                                                                   तसेच संत कोणाला म्हणावे ? ज्याला सत्याची समक्षता लाभलेली आहे त्यास संत म्हणावे …………. ज़्याला खरे काय आहे ते  समजले आहे व त्या ख-या गोष्टिचा अनुभव आला आहे त्यास संत म्हणावे ……। या अर्थाने साईबाबांच्या  चरित्राचा  विचार केल्यास ते संत आहेत व  वंदनिय आहेत .
                  आणि सगळ्यात महत्त्वाचे हे आहे की आपणा आपल्या श्रद्धनीय गोष्टीची पूजा करत असता दुस-यांच्या श्रद्धास्थानांवर संशय ही घेवू  नये व चिखलफेक ही करू नये . व कोणी आपल्या श्रद्धा स्थानावर चिखलफेक केली तर ते पण सहन करू नये ........ हे माझे व्यक्तिगत मत आहे . आपण योग्यायोग्यतेचा विचार करावा . 

पूतना

द्याच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला भगवान पुतना राक्षसीणचा वध करतात . पुतना राक्षसीण भगवंताची मावशी कोणत्या नात्याने होते ?? आणि तिचा पुर्वजन्मोतिहास ………………………..
जेव्हा पूतना ( पूत = पवित्र …. ना =नाही जिचे अंत:करण पवित्र नाही ) भगवंताचे दर्शनास आली …… तेव्हा यशोदामातेने ओळख नसल्याने दर्शनास नाकारले ……तेव्हा तिने यशोदेस ती यशोदेचॆ बहीण आहे असे पटविले ( की जे वास्तव नव्हते ) म्हणून ती मावशी .......... आणि ती राजा बलीची नातेवाईक होती ( कोठे बहीण असा उल्लेख आहे तर कोठे मुलगी असा) जेव्हां वामनास तिने पाहेले तेव्हा तिचे मनात वात्सल्य भाव निर्माण झाला व जेव्हा देवाने बलीसा पाताळात धाडले तेव्हा तीच्या मनात वैर भाव जागृत झाला म्हणून पूतने च्या ठायी वात्सल्य व वैर असे दोन्ही भाव एकसामायावाच्छेदे करू न आहेत …। असे मला वाटते

Sunday, August 24, 2014

लोकांचे प्रकार

जगात चार प्रकारचे लोक असतात क़ांही लोक दुस-याच्या सुखाने सुखी होतात. ……  त्यांच्या बद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात - तुका म्हणे सुख पराविया सुखे / अमृत हे मुखे स्रवतसे //               काही दुस-याच्या सुखाने दु:खी होतात ,त्यालाच मत्सर असेही म्हणतात …  ,काही लोक दुस-याच्या दु:खाने सुखी होतात …. एकदा एका गावात एक प्रतिष्ठित माणूस गावभर पेढे वाटत होता , पण प्रतिष्ठित माणूस असल्याने कोणाचे पेढे वाटण्याचे कारण विचारण्याचे धाडस  झाले  नाही शेवटी एकाने विचारले तुम्ही का पेढे वाटताय ?  आमदारकीचे तिकीट मिळाले  अपत्य प्राप्ती झाली , लोटरी लागली असे नेमके काय झाले की तुम्ही पेढे वाटताय ? ते म्हणाले की शेजारचा बंड्या   नापास झाला  म्हणून मी पेढे वाटतोय  हा प्रकार आहे दुस-याच्याअ दु:खाणे सुखी
 होणा-यांचा आणि शेवटचा प्रकार की काहे लोक दुस-याच्या दु:खाने  दु:खी होतात त्या लोकां बाबत संत तुकाराम महाराज म्हणतात - सत्य बोले मुखे / दुखवी आणिकांचे दु:खे //

Tuesday, August 19, 2014

Rajiv Gandhi

स्वर्गीय राजीव गांधी की जयंती पर उन्हें हार्दीक अभिवादन। राजीव गांधीजी की दूरदर्शिता के वजहसे ही आज भारतवर्ष इस मुकाम तक पहुंचा है। उन्होंने आदरणीय डॉ विजय भटकरजी की नेतृत्वमें में  सी-डेक,श्रीमान सॅम पित्रोदा के नेतृत्व में सी-डॉट ऐसी संस्थाओंकी जो स्थापना की उसी के कारण भारत देश आपने नाम के अनुरूप ( भा याने प्रभा याने ज्ञान और रत याने रमने वाला , भारत याने जो ज्ञान में रमनेवाला हैं। ) ज्ञान क्षेत्र -सॉफ्टवेयर,सूचना-प्रसारण तकनीकी में पूरे जगत में शीर्षस्थ स्थान पर आज पहुंचा है। मै उनकी राजकीय विचारधारासे सहमती नहीं रखता हूँ। फिरभी उनका देश के प्रगती प्रती जो अमूल्य योगदान है उसे याद करके मै उन्हें अभिवादन करता हूँ।

Friday, August 15, 2014

श्रद्धा

प्रथमत: अंधश्रद्धा या शब्दाचा विचार केला पाहिजे अंध + श्रद्धा असे दोन शब्द त्यात आहेत .श्रद्धा या शब्दात श्रत व धा असे दोन शब्द आहेत श्रत म्हणजे सत्य धा म्हणजे धारण करणे य़ा बाबत मला असा प्रश्न असा विचारावासा वाटतो की जर श्रद्धा सत्याला धारण करणारी तर तिला आंधळी कसे म्हणता येईल म्हणून अंधश्रद्धा हा शब्दाच (अंधळा डोळस) या शब्दाप्रमाणे चुक आहे . श्रद्धा या शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे की ज्यांच्या सत्यते बद्दल निश्चय आहे अशा व्यक्ती ग्रंथ या बद्दल असलेला जो पराकोटीचा विश्वास त्यास श्रद्धा म्हणतात .उदाहरणार्थ आपली आई जेव्हा आपल्याला सांगते की हे तुझे वाडील आहेत तेव्हा कोणाला  त्या व्यक्तीची डी एन ए टेस्ट करून खात्री करून घ्यावी असे वाटत नाही य़ाला श्रद्धा म्हणतात . आता प्लांचेट इत्यादी गोष्टी आहेत या श्रद्धा या सदरा खाली येत नाहीत तर या रूढी आहेत काही भारतीय आहेत तर काही पाश्च्यात्य  आहेत ज्या रूढी चुक आहेत त्या नक्कीचं सोडल्या पाहिजेत आणि आपण जेव्हा श्रद्धा ठेवतो तेव्हा ज्या व्यक्तीवर संप्रदायावर ग्रंथावर ठेवतो त्या आधी त्याच्या सत्यासत्यतेची खात्री करून मगच तेथे श्रद्धा ठेवावी असा नियम आहे .  विठठ्लाला साकडे घालणे ही अंधश्रद्धा नाही कारण देवास साकडे कोणत्या गोष्टॆकरिता घालावे की जी गोष्ट आपल्या हातात नाही .पाउस पडणे ईत्यादी गोष्टी निसर्ग( कोणी एका अद्भूत शक्ती ) नियंत्रित करते व ती शक्ती मानवाच्या वागण्या प्रमाणे त्या गोष्टी नियंत्रित कटारे त्यास ऋत असे म्हणतात व अद्भूत शक्तीचे प्रतीक म्हणून विठ्ठलाला साकडे विनंती केली जाते .प्रस्तुत मत हे माझे व्यक्तिगत मत आहे य़ोग्यायोग्यतेचा विचार आपण करावा । 
आरक्षण बारे में कुछ । ……
                आजकल बहोत  जाती के लोग आरक्षण की मांग कर रहे है। किन्तु इस झुंड में समाज का ऐसा भी वर्ग है की जो  आरक्षण की माँगा नहीं कहता है। यह सही है की इस समाजके संवर्गने जो कुछ  पाया है वो आपने बुद्धी के बल पर पाया है।
                जब किसी समाज को आरक्षण लाभ दिया जाता है उसका कारण उनकी सही ढंग में उन्नति हुई नहीं। लेकिन कभी कभी उस समाज अथवा जाती के लोग अनारक्षित जगह का भी फ़ायदा उठाते है क्यों कीआरक्षण के बिना ही वो उनकी इच्छित जगह पा सकते है । इस बजह से अनारक्षित जगह कम हो जाती है और आरक्षित जगह बढ जाती है। और आगे जा कर जब चाहे तब वो जरुरत पड़नेपर आरक्षण का लाभ पुन: उठा सकता है।
              यह अनारक्षित वर्गो के लिए अन्यायकारक है। इस लिये आरक्षण देते समय एक प्रावधान रखना जरूरी लगता है, एक तो आरक्षित वर्ग के लोगो को अनारक्षित जगह का फ़ायदा ना मिले। और यदि आरक्षित जाती का कोई आरक्षण का फ़ायदा नहीं चाहता है तो ये सिद्ध हुआ की उसे आपेक्षित उन्नत स्तर प्राप्त हुआ है। और आगे जाकर उसे और उसके आगेकी पीढीयो को आरक्षण का फ़ायदा ना मिले.
             ये मेरे निजी विचार है लेकिन इसापर विचार होना आवश्य है।